Sunday, September 27, 2020

वाचन आणि मी

 

जेव्हा मी एखादे  पुस्तक वाचायला घेते, तेव्हा त्यातली  मजा, कथा याबाबत  विचार चालू असतात. माझे सर्वात आवडते पुस्तक म्हणजे मृत्युंजय हे पुस्तक वाचून खूप दिवस झाले तरी आजही त्यातील पात्रांचे विशेषतः कर्णाचे केलेले वर्णन युद्धाचे वर्णन आजही डोळ्यासमोर उभे राहते.संपूर्ण महाभारत आत्ताच घडून गेल्या असे वाटते.

मुलां


ना वाचन शिकवताना
, मी मुलांच्या उच्चाराकडे जास्त लक्ष द्यायची मुलं वाचताना पूर्णविराम, अल्पविराम  स्वल्पविराम येथे थांबतात ना याकडे लक्ष असायचे पण या पुढे असे होणार नाही. 

आज मी प्रकट वाचन कार्यशाळा यातून मला मिळालेले अनुभव  आपणासमोर मांडत आहे.

सजगतर्फे आम्हां सर्वांसाठी सजिता मॅमनी तृप्ती अभ्यंकर आणि प्रमोद कांबळे



बळे यांचे प्रकट वाचन कार्यशाळेचे सेशन आयोजित केले.  ही कार्यशाळा म्हणजे आमच्यासाठी एक  वेगळाच अनुभव  आहे. ह्या कार्यशाळेतून प्रकटवाचनाचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले. 

प्रकट वाचनाची तृप्ती मॅमची पद्धत अगदीच वेगळी होती मला पहिल्यांदाच समजले की वाचन ही प्रक्रिया एकदा वाचून चालत नाही तर पुस्तकाचे वाचन तीन चार  वेळा केल्यास पात्र ,स्थळ , वेळ, भावना पात्रांचे बाह्यरुप ,पात्रांचे स्वभाव हे अधिक चांगल्या प्रकारे समजते.

पात्रांविषयीची चर्चा आमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरली. आम्ही व. पू .काळे यांचा बी . एम.पी 42 42 या कथेतील बी एम पी या पात्रा विषयी चर्चा केली तेव्हा प्रत्येकाची त्या पात्र बद्दलची मते खूप वेगवेगळी होती यावरून आम्हाला पात्रांच्या स्वभावातील वैविधता समजली त्यांच्यातील  गुणदोषांवर  सविस्तर चर्चा करता आली.

  माध्यमिक वर्गातील मुलांना शिकवताना वाचन  तीन चार वेळा करणे कसे गरजेचे आहे हे त्यांना यातून समजावता येईल व त्यांच्याकडून पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे वाचून घेता येईल.वाचन करताना पात्र ,स्थळ पात्रांचे बाह्यरूप, त्यांचे गुणदोष या सगळ्यांचा विचार करावा लागतो हे त्यांच्या मनावर बिंबवता  येईल यासाठी या कार्यशाळेचा मला चांगलाच उपयोग करून घेता येईल.

     प्रकट वाचनाच्या एका सेशनमध्ये मॅमनी  "त्या रात्री" या पुस्तकाचे प्रकट वाचन केले त्यावेळेस ते वाचन ऐकताना अंगावर काटा आला व मनात वेगवेगळे विचार येऊन गेले त्यावेळेस झालेल्या चर्चेत  फाळणीचा विषय निघाला फाळणीच्या वेळेचा प्रसंग असावा असे वाटले त्यावेळची सामाजिक परिस्थिती याचा ऊहापोह केला गेला.त्यावेळेस झालेल्या बायका मुलांची म्हातार्‍यांची झालेली परवड याविषयी चर्चा झाली .

   माध्यमिक वर्गातील मुलांसोबत सामाजिक विषयावर जरूर चर्चा करावी यातून मुलांची समाजाविषयीची मते आपल्याला समजू शकतात, आपणही समाजासाठी काहीतरी चांगले काम करू शकतो  हे त्यांच्या विचारांतून आपल्याला समजते.

 चित्रावरून गोष्ट लिहिताना मॅडमनी आम्हाला काही मुद्दे सांगितले जसे  सेटिंग ,वेळ ,स्थळ ,सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती मुड्स, या मुद्द्यांचा विचार करून गोष्ट लिहिल्यास ती अधिक परिणामकारक होते व ती गोष्ट वाचताना वाचकासमोर गोष्ट रुपी चित्रच उभं  राहतं.

     मला पडक्या घराचं चित्र  व त्यावर जमा झालेल्या कोळ्याच्या जाळ्यांच चित्र दिलं होतं मी मॅडमनी सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार करून एक आनंदी ओसाड घर ही गोष्ट लिहिली या गोष्टीत मी बॉम्ब हल्ल्यामुळे विस्कळीत झालेले, आनंदी घर कसे ओसाड झाले  याचे वर्णन केले.  गोष्ट  लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. चित्रावरून गोष्ट कशी लिहावी हे मला समजले.

चित्रावरून गोष्ट लिहिण्याची activity माध्यमिक मुलांना देता येईल त्यामुळे मुलं चित्राचे निरीक्षण करून त्यांच्या मनातील विचार योग्यरीतीने मांडू  शकतील.  मुलांची निरीक्षण क्षमता वाढेल.

मी गेली 18 वर्षे घरगुती प्राथमिक वर्गाच्या शिकवण्या घेत होते त्या वेळेस मुलांसोबत केलेले प्रकट वाचन म्हणजे एक अभ्यासक्रम पूर्ण करणे या उद्देशानेच व्हायचे पण या कार्यशाळेमुळे उशीरा का होईना प्रकट वाचनाचे मूळ उद्दिष्ट समजले आता कोणतेही पुस्तक हातात आले तरी ते तीन चार वेळा वाचून पुस्तकातील स्थळ काळ पात्र पात्रांचे बाह्यरुप  स्वभाव ह्या सगळ्यांचाच विचार सखोलपणे केला जाईल  हे  निश्चित. 


Ruchira Puranik 

SAJAG Volunteer

(Reading Workshop conducted by M/s Trupti Abhyankar, APU Alumni and Mr. Pramod Kamble, SAJAG Project Officer)

Tuesday, September 1, 2020

Learning during Lockdown

Lockdown मुळे distance mode of education चे आमचे प्रयोग चालू आहे. मोठे आव्हान आहे हे आमच्यासाठी. साधनांची कमतरता तर आहेच. त्यासोबतच आपण जे प्रयत्न करतोय त्याचे परिणाम काय आहे हे नीट कळत नसल्याने एक बेचैनी. फोन , whatsaapp, worksheet अशा वेगवेगळ्या मार्गाने मुलांपर्यंत पोहचण्याचे आमचे मार्ग चालू असतात. फोन वर नेहमी योगायोगाने सगळे भेटतीलचं असं नाही. आपण whatsapp वर पाठ्वालेले व्हिडीओ बघितले असतील का? worksheet मधले प्रश्न कळले असतील का ? गोष्टींची पुस्तके वाचतात का ? ह्या प्रश्नांनी सारखं मनात चिंता असते. कारण शिक्षकांसाठी सर्वात उत्कृष्ठ गिफ्ट म्हणजे मुलांच्या चेह-यावरची प्रतिक्रिया. 

आणि आता ती प्रतिक्रिया दिसत नसल्यामुळे एक मोठी दरी आपल्या कामात निर्माण झाली आहे. मग अचानक एक घटना घडते आणि मनातल्या सर्व प्रश्नांचे उत्तर सापडते. रत्नाचा आणि राकेशचा उत्साह (नाव बदलेलं आहे )  आणि रोहन (SAJAG Volunteer) याची ही पोस्ट - अशीच एक प्रेरणादायक घटना आहे . 

..................................................................................................................................................................

सकाळीच सजिताचा मेसेज आला


"तिला पोस्टाने वह्या पाठवल्या रे रोहन,परवाच मिळाल्या तिला वह्या....!"

मनात खूप भावना एकत्र आल्या .काही दिवसांनपूर्वी "सजग"च्या पेजवर एक पोस्ट शेयर केली होती. सजगची एक विद्यार्थिनी कोरोनोच्या अगोदर गावाला गेलेली आणि नेमकी तिकडचे अडकली पण तिने तिच्या नियमित अभ्यास क्रमात खंड पडू दिला नाही काही दिवसांनपूर्वी तिने पिंपळ पानांवर अभ्यास लिहिला आणि त्याचे फोटो सेंड केले त्यात 

रत्ना ने लिहिलं होतं ''पान कुठलही असो अभ्यास झाला ना मॅडम'' आणि म्हणाली "वही संपली आहे" 

परिस्थिती कशीही असो जिद्द माणसाला त्या परिस्तिथीवर मात करायला शिकवते हे लहानपणा पासून ऐकतंच होतो पण ह्या चिमुकलीने ते सिद्ध करून दाखवलं 

महागडे लॅपटॉप,सतत नेट कनेक्शन सर्व सुख सोई असताना सुद्धा नेहमीच परिस्थिती माझ्याच बाबतीत कशी निष्ठुर आहे ह्याच रडगाणं आपण करतं असतो ( मी ही त्यातलाच एक)

पण इच्छा असेल तर माणूस भला मोठा डोंगर सुद्धा फोडतो हेही तितकंच खरं 

रत्नाच्या जिद्दीला आणि सजगच्या कामाला मनापासून सलाम

साजिता,अनुजा,किरण ,भूषण ह्याचा सोबत राहून सजगमध्ये काम करायची संधी मिळते ह्या पेक्षा दुसरं समाधान कोणतंच नाही

आत्ता तिची वही कधीच संपणार नाही

"पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती करणारा बुद्ध आणि पिंपळपानांवर लिहून ज्ञानप्राप्ती करणारी रत्ना आज दोघेही एकचं वाटत आहे .तिची निरागसता अबाधित राहो...